#PRAVACHAN #CHAITANYAMAHARAJDEGLURKAR 3NAMSMARAN #VACHAVIGYANESHWARI #PASAYDAN #NARHARGURUVAIDIKASHRAM #BABAMAHARAJTARANEKAR #SWATIYUVRAJKASHID
This programe was organised by Shri narhar Guru vaidik Ashram,shri brahmachaitanya Gondavlekar shri chaitanyaRam mandir Indore,Majhi Mauli
foundation indore.@shri Narharguru vaidik ashram Rambag INDORE.
मराठी संस्कृती मध्ये कीर्तन परंपरेचे असाधारण असे महत्व असून ते संतवाणी चा आणि प्रबोधनाचा प्रचार - प्रसार प्रभावीपणे करण्याचे सशक्त माध्यम आहे /
याच प्राचीन परंपरेले अनुसरुन इंदुरच्या श्री ब्रम्हचैतन्य गोंदवलेकर महाराज श्री राम मंदीर, श्री नरहर गुरु वैदिकाश्रम आणि माझी माऊली फाउंडेशन या तीन संस्थानच्या संयुक्त विद्यमाने येत्या 1-2 आणि 3 फेब्रुवारी रोजी वैदिकाश्रमाच्या
सर्व सुविधायुक्त ( लिफ्ट व्यवस्था ) भवनात नित्य संध्याकाळी 6 ते 8 पावेतो महाराष्ट्रतील नामवंत कीर्तनकार चैतन्य महाराज देगुलकर यांची तीन दिवसीय प्रवचन माला होणार आहे / ही प्रवचन नाम स्मरण, वाचावी ज्ञानेश्वरी आणि पसायदान या विषयांवर होणार आहेत /
विशेष म्हणजे आयोजन समिती तर्फे तीन ही दिवस जेवण चोख व्यवस्था करण्यात आली आहे तसेच वाहन ठेवण्यासाठी पर्याप्त जागा आहेच /
आयोजन समितीचे ललित नम्र, मोनिका कर्डीले, नितिन पेमगिरीकर, अनिल अत्रे यांनी दिलेल्या माहिती
नुसार चैतन्य महाराज यांच्या मते संतवाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते. आपल्या आयुष्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची जी पद्धत आवश्यक असते, ती देखील शिकविते म्हणून संतवाङ्मयाची कास कधीच सोडू नये.
इंदुरात पहिल्यांदाच येणारे सुदर्शन व्यक्तित्वाचे धनी हभप चैतन्य महाराज हे कीर्तन- प्रवचन क्षेत्रातील-परंपरेतील एक आदर्श आणि प्रसिद्ध नाव असून त्यांच्या कीर्तन+प्रवचनांनी असंख्य भाविकांना प्रभावित केले आहे। त्यांचे प्रवचनाचे विशिष्ट सादरीकरण श्रोत्यांना अक्षरश: भारावून टाकते / त्यांच्या कर्णप्रिय वाणीतील अभंग और भक्ति प्रधान प्रवचन प्रेक्षाकांना भावविभोर करतात / तीर्थनगरी
पंढरपुर निवासी विठ्ठल भक्त हे वारकरी संप्रदायातील उच्चविद्या विभुषित प्रवचनकार आहेत, चैतन्य भानुदास महाराज देगलूरकर हे वेदान्ताचे गाढे अभ्यासक असून विवेक चूडामणी, ब्रम्हसूत्रभाष्य आणि महाभारता बरोबरच ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, श्रीमद्भगवतगीता, श्रीमद्भागवत अशा श्रेष्ठ ग्रंथाचे अभ्यासक आहेत / विसाव्या शतकातल्या तरुण पिढीतील नामवंत कीर्तनकार आहेत. ते धुंडा महाराज देगलूरकर यांचे नातू आहेत. त्यांनी काही वर्षे कॉलेज मध्ये अध्यापन कार्य केले /लोकप्रिय दैनिक सकाळ, दैनिक तरुण भारत मधे अध्यात्मपर लेखमाला प्रकाशित झाली आहे.
"ज्ञानेश्वरीचे पारायण करणे हा संस्कार आहे, तर प्रत्येक ओवीचा अर्थ समजावून घेणे हा जीवनाच्या उदात्ततेचा भाग आहे. अशा अर्थ समजावून घेण्याला एक प्रकारचे वजन असते आणि त्यातून जीवनाची परिपूर्णताही साध्य होते. कारण मला काय कळते, यावर त्या पदार्थाचे अस्तित्व स्वीकारावे की नाही हे ठरते. म्हणूनच डोळ्यांना दिसते त्या पेक्षाही त्या वस्तूचे अस्तित्व समजणे आवश्यक असते. अशी त्यांची शिकवण आहे.
#भावीकांनी ही बहूप्रतिक्षित प्रवचन माला ऐकण्याची सुवर्ण संधी सोडू नये,,,