सिंधुदुर्ग जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. याचे प्रशासकीय केंद्र सिंधुदुर्ग नगरी, ओरोस येथे आहे. सिंधुदुर्ग हा सागरतटीय जिल्हा आहे. सिंधुदुर्गात मालवणी बोली बोलली जाते.
पर्यटन, मासेमारी, आंबा, काजू, फणस हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. सिंधुदुर्गात भात शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. त्याच बरोबर काही हंगामी पिकांची शेती सुद्धा केली जाते. स्थानिक कष्टकरी शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी आपल्या शेतात पिकवलेला भाजीपाला आठवडी बाजारात विकायला नेतात. शेतकऱ्यांना त्यांच्या वस्तू विकण्यासाठी जागा उपलब्ध व्हावी म्हणून कृषी खात्याने कणकवली व कुडाळ या शहरांमध्ये शेतकरी बाजार भरवण्याचा उपक्रम राबविला जेणेकरून सगळे शेतकरी एकमेकांना परिचित होतील व सरकारी योजना त्यांना माहित होतील व ते बचत गटाच्या माध्यमातून त्यांना योजनांचा फायदा घेता येईल.
आजचा कुडाळ शेतकरी बाजाराचा व्हिडीओ तुम्हाला नक्कीच आवडेल. व्हिडिओला लाईक व शेअर करून आपले आरामारी मराठा हे युट्युब चॅनेल Subscribe करावे हि विनंती 🙏
धन्यवाद 🚩
जयहिंद 🇮🇳