#BolBhidu #ShivrajRakhe #MaharashtraKesari2025
महाराष्ट्र केसरी स्पर्धा, महाराष्ट्रातल्या मातीतल्या मल्लांसाठी अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा. कित्येक पैलवान वर्षभर या एका किताबासाठी घाम गाळून सराव करतात, घरापासून लांब राहतात. व्यायामातला प्रत्येक जोर आणि प्रत्येक बैठक डोळ्यांसमोर एकच ध्येय ठेऊन असते, ते म्हणजे महाराष्ट्र केसरीची मानाची गदा. यंदा महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली अहिल्यानगरमध्ये. याहि स्पर्धेत अनेक ताकदीच्या कुस्त्या बघायला मिळाल्या, साहजिकच अंतिम फेरीचा दिवस गाजणार याबद्दल सगळ्यांना खात्री होती. पण अंतिम फेरीचा दिवस कुस्तीमुळं कमी आणि वादांमुळं जास्त गाजला.
मॅटवरच्या फायनलमध्ये डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ भिडले, यात पंचानी कुस्ती चितपट झाल्याचा निर्णय दिला, ज्यावर शिवराजनं आक्षेप घेतला आणि मग झाला राडा. शिवराजचे कोच, त्याचे सहकारी मल्ल हे मैदानात घुसले, शिवराजनंही पंचांशी हुज्जत घातली आणि पंचांची कॉलर पकडत त्यांना लाथही मारली. या राड्यानंतर शिवराजवर तीन वर्षांची बंदी घालण्यात आली. पण अनेकांनी शिवराज राक्षे कुस्तीत चितपट झालाच नव्हता, पंचांनी घाई घाईत हा निर्णय दिला, शिवराज राक्षेवर अन्याय करण्यात आला, अशी भूमिका घेतली. पण नेमकं घडलं काय ? शिवराज राक्षेवर खरंच अन्याय झाला का ? कुस्तीचा नियम नेमकं काय सांगतो ? पाहुयात या व्हिडीओमधून.
चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com
✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला [email protected] या मेल आयडीवर पाठवू शकता.
Connect With Us On🔎
➡️ Facebook : https://www.facebook.com/BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/