MENU

Fun & Interesting

Mangalgad Fort | Chh. shivaji Maharaj Forts and History

Video Not Working? Fix It Now

शिवाजी महाराजांना जावळी स्वराज्यात हवी होती. पण चंद्रराव मोरे दाद लागू देत नव्हते. त्यांस मारल्याशिवाय राज्य साधत नाही, हे पाहून महाराजांनी मोका हेरला आणि जावळीवर हल्ला केला. मोऱ्यांचा खातमा करून जावळी स्वराज्यात दाखल केली; रायगडापासून कोयनेपर्यंतचा मुलूख स्वराज्यात दाखल केला. रायगड, कांगोरी, चंद्रगड, वाझोटा असे किल्ले स्वराज्यात आले. कांगोरीगडाचे नाव महाराजांनी मंगळगड असे ठेवले. हा गड बराच काळ सरदार गोळे यांच्याकडे होता, गायकवाड अन् गोळे यांनी या गड साठी सदैव रक्षण केले आहे 1678 ते 1703 पर्यंत या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी होत असे. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा पडला तेव्हां तेथील धन प्रथम कांगोरीगड येथे हलवून त्यानंतर पन्हाळा येथे नेले.यात सरनौबत पिलाजी गोळे यांची भूमिका महत्त्वाची होती सुमारे १८१७ या सालात सरदार बापू गोखल्यांनी मद्रास रेजिमेन्टच्या कर्नल हंटर व मॉरिसन या इंग्रज अधिकाऱ्यांना अटक करून मंगळगडावर तुरुंगात ठेवले होते. इ.स १८१८ मध्ये कर्नल पॉथर या इंग्रज सैन्याधिकाऱ्याने हा किल्ला जिंकला. #Mangalgad #Kangori

Comment